भाजपने चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट केले!; 'या' नेत्याचे गंभीर आरोप
मुंबई: 'भाजपात कामाची कदर केली जात नाही आणि कौतुक होत नाही. अनेक चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केले आहे', अशा शब्दांत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपवर हल्ला चढवला. ( attacked ) वाचा: 'जिथे कोंडमारा होतो, त्या पक्षात रहायचं नाही असं मी ठरवलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोकळा श्वास घेतला', असे गायकवाड यांनी सांगितले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी पक्ष देईल ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, असेही जयसिंगराव गायकवाड म्हणाले. जयसिंगराव गायकवाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पक्षात स्वागत केले. गेली ३० वर्षे मी जयसिंगरावांना पाहतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा, हे त्यांच्याकडे पाहून कळते. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी कटाक्षाने पाळले, असे कौतुक शरद पवार यांनी केले. वाचा: 'इथून पुढच्या काळात विकासाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपल्याला सहकार्य करू' असे आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला आणि आता जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत आले आहेत. त्यांच्या येण्याने मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी फायदा होणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून जयसिंगराव गायकवाड प्रवेश करत आहेत. त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. प्रत्येकाने ताकदीने पक्ष वाढवला आहे. जयसिंगराव गायकवाड भाजपात काम करत होते. मात्र जनतेच्या हिताची कामे करत नाही. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा हा नेता आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाड्यात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल, असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाड्यात पक्षाला हत्तीचं बळ मिळालं आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fuVHsS
Post a Comment