Header Ads

ad

मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी मंडळाचा प्रशिक्षक तडीपार; काय आहे प्रकरण?

मुंबई: दहीहंडीचा उत्सवाला जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून देणारा प्रशिक्षक याला वर्षभरासाठी तडीपार घोषित करण्यात आलं आहे. राजकीय दबावापोटी पोलीस यंत्रणेचा वापर करून ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचे ढवळे याचे म्हणणे आहे. ढवळेचे काय आहे म्हणणे? एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अन्य एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करत असताना त्याला वाचवण्यासाठी पुढे आलो. त्यावेळी समोरील गटाकडून झालेल्या हल्ल्याला प्रतिकार करताना काही जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यात काही काळ तुरुंगातही राहावे लागले. न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यानंतर पोलीस चौकीत हजेरीही लावली. मात्र, राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेचा वापर करून तडीपारीची नोटीस बजावली आहे, असे ढवळे याचे म्हणणे आहे. संदीप ढवळे याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही कारवाई अन्यायकारक समाजामध्ये दहशत निर्माण करत असून, दुकानदारांकडे खंडणी मागत आहे, असे खोटे आरोप माझ्यावर होत आहेत, असे ढवळे याचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणामुळं माझं कुटुंब दबावाखाली असून, माझ्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. माझी चूक नसताना ही कारवाई केली जात आहे. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे ढवळे याचे म्हणणे आहे. मराठी तरूण असेच तडीपार होवोत आणि देशोधडीला लागोत, अशी व्यथाही त्याने मांडली. कोण आहे संदीप ढवळे? संदीप ढवळे हा मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहे. २६ जुलैचा मुंबईतील महापूर, सातारा-सांगलीतील पूर, कोकणातील चक्रीवादळ आणि करोना काळात संकटात सापडलेल्यांना जीवाची पर्वा न करता मी आणि माझ्या पथकातील खेळाडूंनी मदत केली आहे. मात्र, एका प्रकरणात मला विनाकारण गोवण्यात आले आहे. सराईत गुंडासारखी वागणूक दिली जात आहे, असे ढवळेचे म्हणणे आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39rn9Xz

No comments