Header Ads

ad

अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून मराठी कलाकारांमध्ये जुंपली

मुंबई: भाजपचे नेते यांच्या पत्नी (Amruta Fadnavis) यांनी अलीकडेच गायलेल्या एका गाण्यावरून दोन मराठी कलाकारांमध्ये जुंपली आहे. अमृता यांच्या गाण्याची तुलना गायी-म्हशीच्या हंबरण्याशी करणारे निर्माते-दिग्दर्शक () यांच्यावर अभिनेता () यानं टीका केली आहे. टिळेकर यांनी देखील आरोहला कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर अमृता या गायिका म्हणून पुढं आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी काही गाणीही गायली होती. नुकतंच त्यांचं एक नवं गाणं यू ट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. 'तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या' असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांच्या या गाण्यावर डिसलाइक्सचा पाऊस पडला होता. दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. 'लोक एक वेळ गायी-म्हशींचं हंबरणं सहन करतील पण हा आवाज सहन करणं अशक्य आहे. जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?,' असा प्रश्न त्यांनी केला होता. टिळेकर यांच्या या भाषेवर आरोह वेलणकरनं सोशल मीडियातून टीका केली होती. 'तुम्ही केलेली टीका वाचून लाज वाटली. प्रसिद्धीसाठी करत असाल तर हे अधिकच हीन आहे. सुधरा...' असं आरोहनं म्हटलं होतं. 'तुमच्या मराठी तारका कार्यक्रमात कोण काम करतंय बघू,' असा इशाराही त्यानं टिळेकर यांना दिला होता. आरोहच्या या टीकेला टिळेकर तितकंच जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'बेसूर गाणाऱ्या स्वयंघोषित गायिकेवर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकीवजा संदेश देतोस, तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं? कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार? आधी स्वत:चे करिअर बघ. फूटेज आणि पब्लिसिटी मिळवण्यासाठीच तू बिग बॉस मध्ये गेला होतास ना? का तिथे समाजसेवा करायला गेला होतास? तुझे समविचारी आहेत म्हणून तुला मिरच्या झोंबल्या का?,' असा प्रश्न टिळेकर यांनी केला आहे. 'मराठी कलाकारांची लायकी ट्रेननं फिरण्याची आणि गाय छाप तंबाखू खाण्याची आहे असं विधान तू ज्यांचा भक्त आहेस त्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीने केले होते, तेव्हा तुझे रक्त का उसळले नाही? तेव्हा कलाकारांची बाजू घेऊन बोलायला पुढं का आला नाहीस? कुठं पिऊन पडला होतास की शेपूट घालून बसला होतास? तुझं वय जितकं आहे ना तितकी माझी कारकीर्द आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, मराठी भाषा, महापुरुषांचा, महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अपमान इतर कलाकार करत होते, तेव्हा तू आईच्या पदराआड लपला होतास की मूग गिळून गप्प बसला होतास? स्त्री सन्मान आणि कला सन्मान यातला आधी फरक ओळखायला शिक. जे बेसूर आहे त्याला अमृतवाणी समजून डोक्यावर घेणाऱ्यातला मी नाही. 'पुण्यात हनुमंत गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये भेटून माझ्याकडे काम मागत होतास, ते विसरलास का? जिथं बोलायचं तिथंच मी बोलतो आणि तुझ्यात खरी हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे. माझी पोस्ट वाचून जी आग आणि धूर बाहेर येत आहे तो तुझ्या शरीरातील नेमका कोणत्या अवयावामधून येतोय ते पाहून तुझं बिन टाक्याचे ऑपरेशन करायचे की टाके घालून ते मला ठरवता येईल, असं आव्हानच टिळेकर यांनी आरोह वेलणकरला दिलं आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nEiwwY

No comments