Header Ads

ad

करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; 'हे' आकडे शुभसंकेत देणारे

मुंबईः राज्यात करोनामृत्यूंच्या आकड्यात आज पुन्हा एकदा विक्रमी घट पाहायला मिळाली आहे. राज्याचा करोना मृत्यूदर लक्षात घेता हा खूप मोठा दिलासा असल्याचे दिसत आहे. राज्यात सध्या करोनाचा २.६३% इतका मृत्यूदर आहे. () राज्यात आज ६० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या सात महिन्यांतील हा सर्वात कमी आकडा ठरला आहे. आजपर्यंत राज्यात करोना संसर्ग झाल्याने ४५ हजार ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य यंत्रणांसाठी ही खूप दिलासादायक बाब आहे. तर, सध्या राज्यात ८४ हजार ९१८ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. राज्यातील आजची करोना स्थिती दर्शवणारी आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिद्धीस दिली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत २,५४४ नवीन रुग्णांची भर पडली आहे त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या १७ लाख ४७ हजार २४२ इतकी झाली आहे. तर, आज ३ हजार ०६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख १५ हजार ३७९ करोना बाधित रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ४५ टक्के इतका झाला आहे. मुंबईत रुग्णदुपट्टीचा कालावधी वाढला मुंबईत करोना संसर्गाचा प्रादूर्भाव झपाट्याने खाली येत असून, रुग्ण दुप्पट वाढ कालावधी २५० दिवसांवर पोहोचला आहे. पालिकेच्या नोंदीनुसार या रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होत चालला असून आता ०. २७ टक्के पर्यंत खाली आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UvFCJW

No comments