करोनाच्या नावाखाली केंद्र सरकारने...; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
गली: ‘केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी वाढली. करोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच देशातील उद्योगांच्या उत्पादनात ४० ते ६० टक्के घट झाली होती. देशाची आर्थिक घडी विस्कटण्याचे काम भाजपने केले. करोनाच्या नावाखाली सरकारने अपयश दडवले. भाजप हा पदवीधरांचे प्रश्न वाढवणारा पक्ष आहे,’ अशी टीका जलसंपदा मंत्री () यांनी केली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील () उमेदवारांच्या प्रचारार्थ सांगलीत आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते शनिवारी बोलत होते. वाचा: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. शनिवारी सांगलीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप उमेदवारांच्या प्रतिमेपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘विरोधी उमेदवाराप्रमाणे आमच्या उमेदवारांनी कारखाना बंद पाडला नाही, विकला नाही. शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडवले नाहीत. गेल्या सहा वर्षात या मतदार संघात पदवीधर आमदाराचे काम दिसलेच नाही. शिवसेनेच्या निमित्ताने मोठे मतदान भाजपपासून तुटले आहे. यामुळे प्रत्येक तालुक्यात किमान ७० टक्के मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळेल.’ वाचा: केंद्र () सरकारवर टीका करताना मंत्री पाटील म्हणाले, ‘गेल्या ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी गेल्या तीन-चार वर्षात वाढली. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली. करोना संसर्गाची सुरुवात होण्यापूर्वीच देशातील उद्योगांच्या उत्पादनात ४० ते ६० टक्के घट झाली होती. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. रोजगार वाढवण्याऐवजी सरकारने रोजगार घालवला. भाजप हा पदवीधरांचे प्रश्न वाढवणारा पक्ष आहे, यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळू नये, यासाठी सर्वांनी मतदारांपर्यंत पोहोचून काम करावे.’ कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे सांगितले. देशातील बिघडणाऱ्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार मोहनराव कदम, विक्रम सावंत, सुमन पाटील, मानसिंगराव नाईक, सदाशिव पाटील, पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर, आदी उपस्थित होते. थाळ्या वाजवून काय झाले? करोना संसर्गाच्या काळात पंतप्रधानांनी थाळ्या, टाळ्या वाजवायला लावल्या. यामुळे करोना गेला का? केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशातील अनेक प्रश्न गंभीर बनत आहेत. मंदिरे उघडण्यावरूनही भाजपने राजकीय भांडवल केले. कमी झालेली रुग्ण संख्या पुन्हा वाढू नये, यासाठीच राज्य सरकारने दक्षता घेतली होती, असे मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/333HoXj
Post a Comment