Header Ads

ad

ठाकरे सरकार बदलण्याच्या पुन्हा हालचाली?; 'या' नेत्याने केले मोठे विधान

जालना: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, असे संकेत आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी दिले आहेत. जालना येथे पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर यांनी याबाबत अत्यंत महत्त्वाचे विधान केले. ( On Government ) वाचा: औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी प्रवीण दरेकर येथे आले होते. जालन्यातील परतूर येथे त्यांनी पदवीधर-शिक्षकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दरेकर यांनी राज्यातील ठाकरे सरकारच्या भवितव्यावर भाष्य केले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार बदलण्याच्या हालचाली होणार असल्याचे दरेकर म्हणाले. सरकारच्या एक वर्षाच्या कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. त्याचे पडसाद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पाहायला मिळतील. या पाचही जागांवर भाजपचा विजय होईल व त्यातूनच हे सरकार जनतेला नको आहे, हेसुद्धा स्पष्ट होईल. तिथूनच खऱ्याअर्थाने सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू होतील, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. आज काही राजकीय पक्षांकडून जाती पातीचा उल्लेख केला जात आहे. निवडणूक आल्या की काहींना जात आठवते. जाती जातीमध्ये भेदभाव करण्याचे काम हेतूपुरस्सरपणे केले जाते. जातीच्या नावाखाली तोडा फोडीचे राजकारण काही ठिकाणी सुरू आहे. या जातीपातीच्या भांडणात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण भाजपाने नेहमीच विकासाच्या दिशेने वाटचाल केली. त्यामुळे जे जातीचे राजकारण करीत आहेत त्यांना पदवीधर व शिक्षक मतदार यंदाच्या निवडणुकीत अद्दल घडवतील, असेही दरेकर म्हणाले. राज्यामध्ये गेल्या ४० वर्षात विविध समाजाचे मुख्यमंत्री झाले. पण मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. उच्च न्यायालयात टिकेल असे आरक्षण त्यांनी मराठा समाजाला दिले. पण या ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकविता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजालाही १ हजार कोटीची मदत देत सर्वच समाजाला बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले. पण गेल्या वर्षभरात हे सरकार केवळ जातीपातीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. काळात राज्याची अर्थव्यवस्था नीट ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये कोणताच समन्वय नाही, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आम्ही सरकारवर दबाव आणल्यानंतर सरकारने कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा देत त्यांचे दोन-तीन महिन्याचे थकीत पगार दिले. आता एसटीसाठी सरकार २ हजार कोटीचे कर्ज उभारत आहे. एसटी बस स्थानक, एसटी बसेस गहाण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, यामागे एसटीच्या खासगीकरणचा छुपाडाव या सरकारचा आहे. कारण हे कर्ज फेडण्याची क्षमता महामंडळाकडे अजिबात नाही. कर्ज थकले तर ज्यावर कर्ज घेतले आहे, त्याचा लिलाव होईल व महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे काम खासगी व्यक्तींच्या हाती जाईल, अशी भीतीही दरेकर यांनी व्यक्त केली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kU8VR4

No comments