पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे आहे का?; CM ठाकरेंनी दिला 'हा' इशारा
मुंबई: पुन्हा ' 'च्या दिशेने जायचे नसेल तर वेळीच सावध व्हा, असे अगदी स्पष्ट शब्दांत सांगत मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेला खबरदारीचा इशाराच आज दिला. करोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे संपला असे समजून वावरू नका. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. सध्या तरी गर्दी टाळणे, वापरणे आणि हात धूत राहणे हीच त्रिसुत्री आपल्यासाठी तारणहार आहे. ही त्रिसुत्री तुम्हाला पाळावीच लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ( CM On ) दिवाळीनंतर करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात अद्याप करोनाची दुसरी लाट आलेली नसली तरी दिल्ली, अहमदाबाद आणि सूरत यासारख्या मोठ्या शहरांत करोनाचा परत उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार सतर्क झालं आहे. आरोग्य यंत्रणांना वेळीच सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दुसरी लाट आलीच तर ती परतवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार मुख्यमंत्र्यांनी अन्य विषय टाळून फक्त करोनावर फोकस करत जनतेला आवाहन केलं. आपल्या मोजक्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यातील जनतेला पुढील धोक्यापासून सावध करण्याचेच काम केले. वाचा: करोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असू शकते. अन्य ठिकाणची स्थिती पाहिल्यानंतर त्याचा आताच अंदाज येत आहे. त्यामुळे जो संयम आणि शिस्त तुम्ही आजवर दाखवली आहे तसाच संयम तुम्हाला यापुढे दाखवायचा आहे. आपल्या हातात सध्या खबरदारी घेण्यापलीकडे काहीच नाही. लस अद्याप आलेली नाही. त्याबाबत निश्चित कुणीच काही सांगत नाही. लस आली तरी पुढची प्रक्रिया मोठी आहे. लगेचच राज्यातील साडेबारा कोटी लोकांना लस देता येणार नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. मास्क घालणे, हात धूत राहणे, अंतर राखणे हीच त्रिसुत्री आपल्याला यापुढेही पाळावी लागणार आहे. आपण आज एका नाजूक वळणावर आहोत असेच तुम्ही समजा. या वळणावरून आपल्याला सहीसलामत पुढे जायचे आहे. करोनाचे आकडे जे कमी झाले आहेत ते पुन्हा वाढू द्यायचे नाहीत. देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. तसे आपल्याला काही करायचे नाही. लॉकडाऊनही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर तुमची साथ महत्त्वाची आहे. कृपा करून गर्दी टाळा. जे नियम ठरवले आहेत ते पाळा. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. गर्दी झाली तर करोना मरणार नाही तर वाढणार आहे, हे पक्के ध्यानात असू द्या, अशी कळकळीची विनंती आणि आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी निराशा केली: भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेहमीप्रमाणे निराश करणारे फेसबुक लाइव्ह झाले. जनतेच्या नाराजीची दखल न घेता जनतेवरच नाराजी व्यक्त करणारे हे संबोधन होते. वीजबिलाबाबत काहीतरी दिलासा मिळेल असे वाटले होते पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलले नाहीत. शेतकऱ्यांना मदत, राज्यातील समस्यांवर उपाय असे काहीच या संबोधनात नव्हते, असे नमूद करत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2KwjbT7
Post a Comment