Header Ads

ad

मुंबई: जमावानं तरुणाला खांबाला बांधून केली मारहाण, २ तासांत मृत्यू

मुंबई: मोबाइल चोरीच्या संशयातून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील येथील मुक्तानंद पार्कात ही धक्कादायक घटना घडली. सहा जणांनी तरुणाला एका खांबाला बांधले आणि बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. शहजाद खान असे त्याचे नाव आहे. तो पार्कमध्ये करण्यासाठी आल्याचा आरोप परिसरातील काही लोकांनी केला. त्याचदरम्यान काही जणांनी त्याला पकडले आणि बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या भावाने चोरीचे आरोप फेटाळून लावले. शहजाद हा कधीच चोरी करणार नाही. त्याची हत्या करण्यामागे वेगळे कारण असावे, असे त्याच्या भावाने म्हटले आहे. पार्कमधील कामगारांचे मोबाइल चार्जिंगसाठी लावले होते. ते मोबाइल चोरण्यासाठी शहजाद तिथे गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांताक्रूझ पोलिसांनी रविवारी सहा जणांना अटक केली आहे. ऋषिकेश पासी, हयात अली, अलिमुद्दीन शेख, मोतिबुर आलम, फिरोजुद्दीन आणि पिंटू कुमार अशी आरोपींची नावे आहेत. हे सहाही जण पार्कात रिपेअरिंगची कामे करतात. मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबरला मध्यरात्री साडेबारा ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली. काही कामगार अचानक झोपेतून जागे झाले. त्यावेळी तिथे आलेल्या शहजादला त्यांनी पकडले. मोबाइल चोरीचा संशय त्यांनी घेतला आणि त्याला खांबाला बांधून मारहाण केली. बेशुद्धावस्थेत तो घराच्या जवळ पार्क केलेल्या एका रिक्षात आढळून आला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याला मृत घोषित केले. मारहाणीनंतर दोन तासांत तो मरण पावला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pzpYuB

No comments