आईच्या आत्महत्येच्या प्रयत्नात २ लहान मुलांनी गमावला जीव; बारामतीतील घटना
: करणाऱ्या आईला पाहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यात घडली आहे. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर महिलेने पाण्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिला पाहण्यासाठी गेलेल्या दिव्या (वय ४) व शौर्य (वय २) यांना आपला जीव गमवावा लागला. बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी (रा. पिंपळी, ता. बारामती) या दोघांमध्ये काही कारणाने वादावादी झाली. रागाच्या भरात पिंपळी येथील खाडीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्येचा निर्णय अंजली सूर्यवंशी यांनी घेतला. पहाटे तीनच्या सुमारास राग अनावर झाल्याने त्या वेगाने पाण्याकडे गेल्या. त्यांनी पाण्यात उडी मारल्यानंतर त्यांची दोन मुले दिव्या (वय ४) व शौर्य (वय २) त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ आली. आई बुडत असल्याचं या लहानग्यांना पाहावलं नाही आणि त्यांनीही आईच्या दिशेने उडी मारली. या घटनेत दोन्ही मुले एकापाठोपाठ पाण्यात पडली. दरम्यान, अतुल सूर्यवंशी यांनीही पत्नी अंजलीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, त्यांनी अंजलीला पाण्याबाहेर काढले पण या गडबडीत दोन्ही मुले पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडली. दोन्ही मुले लहान असल्याने त्यांना बचावाची संधीच मिळाली नाही. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह घटनेनंतर सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vzc27c
Post a Comment