धक्कादायक: पुण्यात पाणीपुरीवरून झालेल्या वादानंतर पत्नीची आत्महत्या
पुणे: पतीने न विचारताच आणल्यामुळे पत्नीने वाद घालत ती पाणीपुरी खाल्ली नाही. त्यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याच रागातून पत्नीने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील परिसरातील सिंहगड व्हिलामध्ये घडली. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक झाली आहे. ( ) वाचा: (वय २३, रा. आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती (वय ३३, मूळ रा. पश्चिम मंगळवार पेठ, बुधले गल्ली, सोलापूर, सध्या- आंबेगाव पठार) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गहिनीनाथ हा मूळचा सोलापूरचा असून त्याचे प्रतीक्षासोबत चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुल आहे. सरवदे हा पुण्यात खासगी ठिकाणी नोकरी करतो. लग्नानंतर सरवदे हा पत्नीला पुण्याला घेऊन जात नव्हता. त्यावरून दोघांमध्ये वाद होत होते. त्यातून आरोपीने प्रतीक्षाला शिवीगाळ करून मारहाण केली होती. वाचा: गेल्या काही महिन्यांपासून दोघेही पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत होते. एका भाडेतत्वावरील खोली त्यांनी घेतली होती. २८ ऑगस्ट रोजी गहिनीनाथने पत्नीला खाण्यासाठी पाणीपुरी आणली होती. मात्र, मला न विचारताच पाणीपुरी का आणली म्हणून पत्नीने वाद घालत पाणीपुरी खाल्ली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. वादातून प्रतीक्षाने राहत्या घरात विष प्राशन केले. त्यानंतर तिला तात्कळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे हे अधिक तपास करत आहेत. आरोपी गहिनीनाथ अंबादास सरवदे या पोलिसांनी अटक केली आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bwb4LB
Post a Comment