'ईडी'च्या नोटीसवर मंत्री अनिल परब बोलले; केला 'हा' महत्त्वाचा दावा
मुंबई: राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्याला ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. परिवहन मंत्री अॅड. यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले असून या नोटीसनंतर परब यांनी मोजक्या शब्दांत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीने नोटीसमध्ये कारण नमूद केलेले नाही, असा दावाही परब यांनी केला आहे. ( ) वाचा: ईडीने अनिल परब यांना ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. अशी नोटीस मिळाल्याच्या माहितीला अनिल परब यांनीही दुजोरा दिला व माध्यमांकडे याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली. ईडीने मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्याला उत्तरही कायदेशीररित्या दिले जाईल, असे सांगत अनिल परब यांनी महत्त्वाचा दावा केला. 'ईडीची नोटीस आज संध्याकाळी मला मिळाली. या नोटीसमध्ये सविस्तर काहीच लिहिण्यात आलेले नाही. कोणत्या प्रकरणात ही नोटीस आहे त्याचाही उल्लेख केला गेलेला नाही. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आपण आमच्या कार्यालयात हजर व्हावे इतकाच उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. त्यामुळे कशासाठी ही नोटीस आहे हे आता मलाही सांगता येणार नाही', असे परब यांनी सांगितले. वाचा: 'असं काहीतरी होईल हे आम्हाला अपेक्षितच होते. त्यामुळे आता नोटीस आल्यावर त्याला सामोरे जावे लागेल. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर दिले जाईल. ज्यावेळी ही नोटीस नेमकी कशासाठी बजावली ते कळेल तेव्हाच त्याला उत्तर देता येईल. यावर आताच अधिक काही बोलता येणार नाही', असेही परब यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट याला दिल्याचा आरोप झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी हा आरोप केला आहे. याप्रकरणी सीबीआय आणि या केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास सुरू असून याच प्रकरणात ईडीने आता अनिल परब यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jnQ5UO
Post a Comment