साकीनाका प्रकरणात १८ दिवसांत आरोपपत्र; 'त्याने' रागाच्या भरात...
मुंबई: मुंबईतील येथे ३२ वर्षीय महिलेवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात जलद गतीने तपास करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात ७७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून दिंडोशी येथील न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. ( ) वाचा: साकीनाका येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी आरोपी याला अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीला कठोर शासन देऊन पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले होते. एका महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल व हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी विक्रमी वेळेत म्हणजे केवळ १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले आहे. तपास अधिकाऱ्यांनी एकूण ७७ जणांचे जबाब नोंदवले असून आज दाखल करण्यात आले आहे. वाचा: आरोपीने रागाच्या भरात हे कृत्य केले. पीडित महिला ही आरोपीला आधीपासून ओळखत होती. त्यांच्यात जवळीक होती. मात्र, दिलेले आश्वासन न पाळल्याने आरोपीच्या मनात तिच्याबद्दल राग होता. गुन्हा घडला त्याआधीही आरोपीने महिलेला भेटण्याचा प्रयत्न केला. २५ दिवसांपूर्वी त्याने तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळेच बऱ्याच प्रतीक्षेनंतर ती भेटली तेव्हा रागाच्या भरात त्याने तिच्यासोबत अमानुष कृत्य केले. यात लोखंडी सळीचाही त्याने वापर केला. हे कृत्य पूर्वनियोजित कट नव्हता, असे पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी कुणीही वकील पुढे आलेला नाही. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uhQtrM
Post a Comment