Header Ads

ad

जळगावातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

जळगाव: जिल्ह्यातील , पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना कोकणच्या धर्तीवर शासनाकडून मदत दिली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने अतिरीक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ( CM Uddhav Thackeray On ) वाचा: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्री यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली. वाचा: सरकार जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांच्या पाठिशी: मुख्यमंत्री आपत्तीग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी असता त्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून यावरून तात्काळ मदत जाहीर करता येईल. कोकणच्या धर्तीवर ही मदत आपत्तीग्रस्तांना तातडीने देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V9jk4C

No comments