Header Ads

ad

मंत्रिमंडळाची बैठक 'डेक्कन ओडिसी'त!; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले...

मुंबई: 'पर्यटन विभागाकडे पूर्वी दुर्दैवाने कुणी लक्ष दिले नव्हते पण आता पुढील काळात आपण या विभागाला महत्त्व देणार आहोत', असे सांगतानाच राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक रेल्वेमध्ये घेण्यात येईल, अशी घोषणाच आज मुख्यमंत्री यांनी केली. करोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेल्या भरीव कामाचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले. ( ) वाचा: राज्याच्या पर्यटन विभागाकडून आज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री , राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी विविध पर्यटन प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. वाचा: मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात पर्यटन विकासासाठी राज्यात जी पावले उचलण्यात येत आहेत त्याचे स्वाग केले. येत्या काळात या विभागाकडे अधिक लक्ष देण्याची ग्वाहीच मुख्यमंत्र्यांनी दिली. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका पर्यटन व्यवसायास बसला पण अशा परिस्थितीत देखील तुम्ही नवीन योजना, उपक्रम आणले, रोजगार दिला हे कौतुकास्पद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. करोना काळात महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेले काम प्रशंसनीय आहे. येणाऱ्या काळात राज्यात येणारा प्रत्येक पर्यटक आपला ब्रँड ॲम्बेसेडर झाला पाहिजे, इतक्या चांगल्या दर्जाचे पर्यटन महाराष्ट्रात विकसित व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपण सुविधा निर्माण करू शकतो पण त्या टिकवणे आणि त्यांना दर्जेदार ठेवणे देखील महत्त्वाचे आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. वाचा: देशातील १२०० लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात ८०० लेणी आहेत असे मी आत्ताच प्रसिद्ध इतिहास संशोधक दाऊद दळवी यांच्या पुस्तकात वाचले. आपल्याला खरोखरच किती लेणी ठाऊक आहेत? आपल्या पूर्वजांनी अप्रतिम लेणी खोदली, शिल्पे निर्माण केली. आपण म्हणतो की आपण खूप विकास केला पण त्या काळातल्या सारखे दगडातून रेखीव शिल्प आज आपण निर्माण करू शकतो का?, असा प्रश्न विचारताना आजच्या युगातली लेणी निर्माण करायला हवी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कास पठारासारखी अनेक पठारे शोधून आपण ती ठिकाणे लोकप्रिय करू शकतो. जुनं ते सोनं आहे आणि आपण ते जपतोय पण नवीन सुद्धा निर्माण करण्याची हिम्मत आमच्यात आहे हे दाखवून दिले पाहिजे, असे नमूद करताना महाराष्ट्राचे वैभव जपा आणि वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. कोविड काळात पर्यटन विभागाने स्वस्थ बसून न राहता पर्यटनक्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद कार्य केलं आहे. येत्या काही वर्षात कोविडमुक्त जगात याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्र जगाच्या पर्यटन नकाशावर अग्रस्थानी झळकेल हा विश्वास आहे, असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zFYAPX

No comments