अनिल देशमुखांच्या जावयाला CBIने घेतले ताब्यात; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते यांना सीबीआयने खूप मोठा धक्का दिला आहे. देशमुख यांचे जावई यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. चतुर्वेदी हे वरळी येथे आले असता ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ही कारवाई कोणतीही नोटीस न देता करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून या कारवाईनंतर देशमुख कुटुंबीयांकडून सीबीआयवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ( ) वाचा: अनिल देशमुख यांचा वरळी येथील सुखदा इमारतीत फ्लॅट असून तिथे गौरव चतुर्वेदी आले होते. ते तिथून बाहेर पडल्यावर वरळी सी लिंकजवळ सीबीआयच्या दहा जणांच्या टीमने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. चतुर्वेदी यांच्यासोबत देशमुख यांचे वकील होते. त्यांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून देशमुख कुटुंबीयांनी सीबीआयवर गंभीर आरोप केला आहे. गौरव चतुर्वेदी यांचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एकप्रकारे अपहरणच केल्याचा त्यांचा आरोप आहे. वाचा: अनिल देशमुख प्रकरणात पहिली मोठी कारवाई अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला असून याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात आजवर गौरव चतुर्वेदी यांचे नाव एकदाही पुढे आले नव्हते. मात्र, त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आल्याने देशमुख कुटुंबीयांना मोठा हादरा बसला आहे. काँग्रेसने केला निषेध केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटिसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. "देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे " असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे, असे नमूद करताना या प्रकाराचा जाहीर निषेध करण्यात येत आहे, असे ट्वीट प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jxf4VW
Post a Comment