Header Ads

ad

उधारीवर जेवण दिलं नाही म्हणून चाकूने केला वार; हॉटेल चालकाची मृत्यूशी झुंज

औरंगाबादः हॉटेल चालकाने उधारीवर जेवण देण्यास नकार दिल्यामुळे त्यावर चाकू हल्ला केल्याची घटना औरंगाबादच्या पाटोदा भागातील रानवारा येथे घडली. हल्ल्यात हॉटेलमालक गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पाटोदा रोडवर अनिल वानखेडे यांचे रानवारा नावाचे हॉटेल आहे. नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून आवराआवर करून घरी निघत असताना ११ वाजेच्या सुमारास दारू पिऊन आलेल्या एका टोळक्याने अनिल यांना उधार जेवण मागितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने ह्या टोळक्याने अनिल यांच्याशी वाद घालायला सुरवात केली. तर गाडीवर दगड मारत अनिल यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे हॉटेलमध्ये असलेला अनिल यांचा पुतण्या निलेश मदतीला धावून आला. याचवेळी टोळीतील एकाने निलेशच्या पोटात धारधार चाकू खुपसत पाठीवरही वार केले. वाचाः ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली असून जखमी निलेश घाटीत मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी सातारा ठाण्यात अनिल वानखेडे यांच्या फर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील आरोपी अनिल ऊर्फ वॉन्टेड, सुरेश गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, विजय दुबे या चौघांना पोलिसांनी अटक केली. तर पाचवा आरोपी सध्या फरार झाला आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mxS6yO

No comments