इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार, 'त्या' आक्षेपार्ह विधानप्रकरणी आज अंतिम सुनावणी
औरंगाबाद : कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने दाखल केलेल्या खटल्यात आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद खंडपीठात ही सुनावणी होणार असून यात आज काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपल्या कीर्तनात बोलतांना, समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावर आक्षेप घेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या वतीने संगमनेर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात अपील करण्यात आलं, ज्यात अपील मंजूर करत न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील खटला रद्द केला होता. यामुळे जिल्हा न्यायालयाच्या या निकालाला आव्हान देत याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. इंदुरीकर यांच्या विरोधातील तक्रार रद्द करू नये अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. तर ऍडव्होकेट जितेंद्र पाटील व नेहा कांबळे यांनी गवांदे यांची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या सुनावणीवर आज अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dxAka4
Post a Comment