आईची सतत आठवण यायची म्हणून गर्भवती लेकीने उचलले धक्कादायक पाऊल
हिंगोलीः आईच्या निधनामुळे हताश झालेल्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील बासंबा येथे मागील काही दिवसांपूर्वी आईचे निधन झाले होते. आईच्या निधनामुळं दुःखी झालेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बासंबा येथील बजरंग कुरवाडे यांचा विवाह अंतकला हिच्यासोबत झाला होता. त्यांना चार मुली व एक मुलगा असं कुटुंब होते. काही वर्षानंतर त्यांची पत्नी अंतकला हिचे निधन झाल्याने त्यांनी दुसरा विवाह केला होता. मागील वर्षी पहिल्या पत्नीची मुलगी शीतल हिचा विवाह बोरी शिकारी येथील विठ्ठल होळकर यांच्या सोबत झाला होता. वाचाः विवाहानंतर ती सासरी नांदायला देखील गेली होती. काही दिवस सगळं सुरळीत चालू असताना शीतलला तिच्या आईची नेहमी आठवण येत असल्याने ती त्याच दुःखात राहत होती. माझी आई नसल्याने माझं कसं होईल असे ते नेहमी म्हणत होती. परंतु सासरचे अनेक जण तिला समजवण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच दरम्यान तिने काल गोठ्यातील लाकडी दांड्याला गळफास घेत आपले जीवन संपवले. वाचाः या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळताच शितलाला उचलून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. शीतलला तपासून डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी मयत शितलचे वडील बजरंग कुर्डूवाडी यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलिस अधिक करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील शितल होळकर ही गर्भवती आल्याची महिती पोलीसांनी दिलीय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32qFJhl
Post a Comment