महापालिका निवडणुकांसाठी भाजपची तयारी, नव्याने २१ जणांना दिली संधी
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर दिलेल्या भाजपने सोमवारी शहर कार्यकारणीचा विस्तार केला. यात नव्याने २१ जणांना संधी देण्यात आली आहे. यात काही माजी नगरसेवक तसेच जुन्यासह नवीन कार्यकर्त्यांना शहर कार्यकारिणीवर काम करण्याची संधी देण्यात आल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयात सोमवारी आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. याप्रसंगी शहर सरचिटणीस राजेश मेहता, राजु शिंदे, समीर राजुरकर, शिवाजी दांडगे, संजय जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश सचिव प्रविण घुगे, शिरीष बोराळकर, भगवान घडमोडे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. असे आहेत पदाधिकारी शहर कार्यकारिणीत यापूर्वी ३२ जणांचा समावेश होता. यात आता नव्याने आणखी २१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यात शहर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, अरविंद डोणगावकर, सखाराम पोळ, दीपक ढाकणे, राजू पाटील, मुकुंद दामोधरे, माजी नगरसेविका जयश्री किवलेकर, माजी नगरसेक गोकुळ मलके, रावसाहेब गायकवाड, विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शहर सचिवपदी अमेय देशमुख, संजय खनाळे, रामचंद्र नरोटे,नंदलाल गवळी, बाबासाहेब ससाणे, शंतनू उर्हेकर, सागर निळकंठ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मयूर वंजारी, मंदिप राजपूत व अमित लोखंडे यांची सहसचिवपदी नियुक्त करण्यात आली. आध्यामिक आघाडीच्या शहर संयोजकपदी गणेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mCgxeS
Post a Comment