महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण; राज्यात पुन्हा निर्बंध?; आरोग्यमंत्री म्हणतात...
जालनाः दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉनचा विषाणूचा ()भारतात शिरकाव झाला असून कर्नाटकात दोन रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण देशात सापडल्याने देशातील आरोग्य यंत्रणा सक्रीय झाली आहे. तर, राज्यानंही योग्य ती पावलं उचलली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री ()यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री मंसुखजी मांडवीय व आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्याशी चर्चा करून याबाबत माहिती घेतली आहे. राज्यातील निर्बंधांबाबतही आरोग्यमंत्र्यांनी दिलासादायक बातमी दिली आहे. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातच आता ओमायक्रॉननं शिरकाव केल्यानं आता राज्यात बारकाईनं लक्ष ठेवावे लागेल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. मुंबई विमानतळावर आतापर्यत ८९७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर करण्यात आली असून यामध्ये आतापर्यत ३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हे नमुने जिनोमिक सिक्वेसिंग साठी पाठवण्यात आले असून त्याचे अद्याप रिपोर्ट आले नाही. राज्यात दोन ठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग लॅबच काम सुरू असून एक मुंबईत आणि दुसरं पुण्यात सुरू आहे. आतापर्यत जे तीन नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे त्यांच्या संपर्कातील २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांचेही रिपोर्ट अजून आले नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. वाचाः महाराष्ट्रात अजून एकही ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही ही एक दिलासादायक बाब आहे. तरीही आपण सतर्क असून राज्यात जिनोमिक सिक्वेसिंग लॅब वाढवाव्या लागतील, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. लसीकरणच आपल्याला ओमायक्रॉनपासून वाचवू शकेल असं तज्ज्ञाचं मत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे. करोना विषयक नियम पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. वाचाः दरम्यान, कर्नाटकमध्ये आढळलेल्या दोन ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णापैकी एका रुग्णांच्या संपर्कातील ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून या ६ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्यांचे अहवाल आले नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कर्नाटकमध्ये २ रुग्ण आढळून आल्याने सध्यातरी नवीन निर्बंध लावण्याची शक्यता नसून परिस्थितीनुसार केंद्र सरकार देईल त्या सूचना पाळल्या जातील, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. वाचाः
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DhP07T
Post a Comment