Header Ads

ad

New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का?

औरंगाबाद : ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने ३१ डिसेंबर रोजी नववर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करावे असे आवाहन केले आहे. नववर्षाचे स्वागत करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी गुरुवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या अनुषंगाने थर्टी फस्ट व नववर्षाच्या स्वागतानिमित्ताने नागरिकांनी घराबाहेर पडून गर्दी करू नये; त्याचप्रमाणे नववर्षाचे स्वागत शक्यतोवर घरीच साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन या मार्गदर्शन सूचनेद्वारे करण्यात आले आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली असून, या आदेशाचे पालन करावे. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर व नूतन वर्ष स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत व खुल्या जागेत आयोजित कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी गर्दी होणार नाही सुरक्षित अंतराचे पालन करण्यासह मास्क, सॅनिटायझरचा वापर यासह अन्य दक्षता घेणे आवश्यक राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षांवरील नागरिक व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर मनाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढू नये; तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे, असेही या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे. . नागरिकांनो लक्षात ठेवा... - रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी. - फटाक्यांची आतषबाजी करण्यास मनाई - मिरवणूक काढण्यास बंदी - नववर्षाच्या स्वागतासाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई. - करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32RbcsI

No comments