Header Ads

ad

Raut gives reply to Amit Shah: शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या अमित शहांना संजय राऊत यांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) यांनी काल पुण्यातील कार्यक्रमात (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीकास्त्र सोडल्यानंतर आता विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असे राजकीय युद्ध रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. हिम्मत असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करावे, अशा शब्दात अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला ललकारले आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार यांनी शहा यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (shiv sena mp gives reply to central home minister ) विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेनेने वचन मोडले आणि मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडले, अशी जहाल टीकाही शहा यांनी काल केली आहे. त्यावर शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडलेला नाही आणि सोडणारही नाही, असे म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- अमित शहा काल पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेली वक्तव्ये ही संपूर्णपणे असत्याला धरून आहेत. कालच्या संपूर्ण भाषणामध्ये अमित शहा हे नक्की खरे काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारबाबत आणि आमच्या हिंदुत्वाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शहा यांना घणाघाती प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही हे वैफल्य आम्ही राज्यातल्या नेत्यांमध्ये असल्याचे पाहत आहोत. पण आता तर त्यांचे सर्वोच्च नेतेही त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे पाहिले की मग आम्हाला त्यांची दया येते आणि आश्चर्य वाटल्यावाचूनही राहात नाही, असेही राऊत पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडलेला नाही' शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा कधीही सोडलेला नाही आणि सोडणारही नाही. आमच्यासारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला केवळ सत्तेसाठी दूर करताना आणि सत्तेचा वाटा जास्त मिळावा यासाठी २०१४ साली शिवसेनेला दूर करा असे राज्यातील नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते, हे अमित शहा यांनीच स्पष्ट करावे, असे आवाहनही राऊत यांनी केले आहे. तुम्ही वेगळे लढून दाखवा असे ते २०१४ सालीही म्हणाले होते. त्यावेळी आम्ही वेगळेच लढलो होतो. प्रचंड ताकद, पैसा आणि सत्तेची लाट असूनही आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे लढलो, असेही राऊत पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mjfRed

No comments