'झोंबिवली’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा; स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आजपासून प्रदर्शित होत असलेल्या ‘’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिल्यानंतर अपिलकर्ते चित्रपटकार तरुण वाधवा यांनीही स्थगितीसाठी आग्रह धरला नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सारेगम इंडिया लिमिटेड कंपनी निर्मित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या मराठी चित्रपटात अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, जानकी पाठक व शरत सोनू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (release of film has been cleared and the suspension of the film has been rejected by the high court) ‘मी झोंबींविषयीच्या विनोदी कथेचा विषय घेऊन सारेगमा कंपनीच्या युडल फिल्म्सकडे गेलो होतो. युडलने संपूर्ण पटकथा तयार करून येण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी पटकथा घेऊन गेलो. मात्र, तेव्हा स्वारस्य नसल्याचे सांगत कंपनीने प्रस्ताव फेटाळला. नंतर कंपनीने स्वत:च जुलै-२०२०मध्ये झोंबिवली नावाच्या चित्रपटाची घोषणा करत निर्मिती केली’, असा आरोप करत वाधवा यांनी अॅड. राहुल अजातशत्रू यांच्यामार्फत दावा दाखल केला. क्लिक करा आणि वाचा- चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा विनंती अर्जही वाधवा यांनी गेल्या वर्षी केला होता. मात्र, ‘निव्वळ कथाकल्पनेवर कोणाचे स्वामित्व हक्क प्रस्थापित होऊ शकत नाही. जेव्हा दोन कल्पना विकसित होतात तेव्हा काही साम्य असणे स्वाभाविक आहे’, असे निरीक्षण नोंदवत न्या. गौतम पटेल यांनी नोव्हेंबर-२०२१मध्ये अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात वाधवा यांनी खंडपीठासमोर अपिल दाखल केले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन २६ जानेवारीला करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रदर्शन रोखण्यासाठी अर्ज केला. त्याविषयी न्या. शाहरुख काथावाला व न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. क्लिक करा आणि वाचा- ‘प्रेते उठून त्यांच्या हालचाली सुरू होतात, असे दाखवणाऱ्या झोंबींची कल्पना ही नवीन नाही. म्हणूनच उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने याचिकादाराचा अर्ज पूर्वी फेटाळला होता’, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील विराग तुळजापूरकर व अॅड. हिरेन कमोद यांनी कंपनीतर्फे मांडला. बुधवारी (आज) २६० चित्रपटगृहांत चित्रपटाचे प्रदर्शन होणार असून तिकीटविक्री खुली झाल्याचेही कमोद यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर खंडपीठाने प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार देतानाच अपिलावर ३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. तसेच अपिलात यशस्वी झाल्यास तुमचे हितरक्षण होईल, असेही अर्जदारांना सुचवले. त्यानंतर स्थगितीचा आग्रह वाधवा यांनी मागे घेतला. त्यानुसार, खंडपीठाने अपिलावर ३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी ठेवली. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32wx25f
Post a Comment