Header Ads

ad

dalvi vs kadam: बंगाली विद्या नाही तर जनतेची विद्या चालली; दळवींचा कदम यांना टोला

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणूक निकालानंतर विरुद्ध शिवसेना नेते हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सूर्यकांत दळवींनी केलेल्या टीकेला रामदास कदम यांनी आपण कवडीचीही किंमत देत नसून त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचा प्रश्नच नाही असे म्हटले आहे. ( criticizes shiv sena leder ) दापोली नगरपंचायतीच्या निवडणूकित मिळालेले यश हे रामदास रामदास कदम यांची बंगाली विद्या चालली नाही तर जनतेची विद्या चालली अशीही जहरी टीका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केली आहे. त्यांचे दापोलीत सत्ता मिळवण्याचे स्वप्न आम्ही धुळीस मिळवले असून त्यांच्या शिवसेवा आघाडीच्या अपक्ष उमेदवारांचा धुव्वा उडवल्याची प्रतिक्रिया दळवी यांनी दापोलीत बोलताना दिली आहे. आपण काहीकाळ आज्ञातवसात होतात असा प्रश्न दळवींना पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, आम्ही कधीही पक्ष सोडला नव्हता आम्ही दापोलीतच होतो आमचे स्वतंत्र शिवसेनेचे काम सुरू तीसवर्षे आपण काम करत असतात आमची आमंत्रण डावलली,अधिकार व पदे काढून घेतली त्यामुळे नाराजी वाढली होती अस दळवी यांनी यावेळी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- मात्र आपल्यावर पक्षाने यावेळी विश्वास टाकला ते काम आपण करून जनतेने कौल राष्ट्रवादी शिवसेना आघाडीला दिला आहे. या निवडणुकीत पक्षापेक्षा कोणीही मोठे नाही, शिवसेना या चार अक्षरामुळे स्वतःची ओळख असल्याचे काहीजण या निवडणुकीत विसरले होते. शिवसेना व राष्ट्रवादी यांची आघाडी व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती व त्याप्रमाणे त्यांनी आदेश दिले. मात्र माझ्यापेक्षा या मतदारसंघात कोणी मोठा नाही, असा भ्रम अनेकांना झाला होता. त्याचा भ्रमनिरास येथील मतदारांनी केला. अजूनही वेळ गेली नाही. पक्षामध्ये योग्य पद्धतीने कार्यरत व्हा, असा संदेश आपण सर्वांना या निमित्ताने देतो अस यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- दळवीच्या आरोपांना आपण कवडीची किंमत देत नाही- रामदास कदम दरम्यान या ससगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी बोलताना सांगितले की आपण सूर्यकांत दळवी यांच्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही त्यामुळे आपण कोणतेच उत्तर दळवींना देणार नाही मात्र दापोलीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात देणाऱ्या सूर्यकांत दळवींना माझ्या शुभेच्छा आहेत असा उपरोधिक टोलाही त्यांना लगावला आहे. आपण दापोलीनगरपंचायत निवडणूकित कुठेच नव्हतो मी दापोलीत आलोही नव्हतो त्यामुळे दळवींना व त्यांच्या आरोपांना आपण कवडीचीही किंमत देत नाही. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tLMcyy

No comments