म्हणून महिलेच्या गालाचा चावा घेणाऱ्या आरोपीची न्यायालयाने केली निर्दोष सुटका; प्रकरण वाचून...
औरंगाबाद : औरंगाबादच्या एका विचित्र प्रकरणात जिल्हा न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला असून, चावा घेणे म्हणजे दात हे घातक हत्यार नाही, असा निर्वाळा देत संशयित दाम्पत्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. एच.खेडकर यांनी निर्दोष मुक्त केले. एका महिलेनं आपल्या धाकट्या जावेच्या गालाचा चावा घेतला होता, त्याप्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. अधिक माहिती अशी की, मीनाबाई सोमनाथ पल्हाटे असं फिर्यादी महिलेचं नाव असून, २०१२ मध्ये त्यांचा आपली थोरली जाऊबाई सुनीता यांच्यासोबत घरातील कुठल्याशा मुद्यावरून वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात सुनीता यांनी आपली धाकटी जाऊ मीनाबाई यांच्या गालाचा चावा घेतला. यामध्ये मीनाबाई यांच्या नाकाच्या बाजूला आणि डोळ्याच्या खाली जखम झाली होती. त्यामुळे प्रकरण पोलिसात गेले आणि पोलिसांनी कलम ३२४ नुसार (धोकादायक शस्त्रांनी दुखापत करणे) असा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याप्रकरणी अर्जदार दाम्पत्याने अॅड. रमेश घोडके पाटील यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. तर सुनावणीदरम्यान अॅड. घोडके यांनी युक्तीवाद केला की, सदर गुन्हा हा उशिरा दाखल झाला असून फिर्याद ही संशयास्पद आहे. तसेच जखमेचा प्रकार हा साधा असून चावा घेतल्याचा आरोप असला जखम चावा घेतल्याने झालेली नाही. याशिवाय दात हे घातक हत्यार आहे की नाही हे सरकार पक्ष सिद्ध करु शकला नाही. त्यामुळे कलम ३२४ लागू होत नाही, असं म्हणत सुनावणीअंती पल्हाटे दाम्पत्याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oBTHq4L
Post a Comment