हिजाब वाद: मुंब्र्यात मुस्लीम महिलांनी दिला 'जय श्रीराम'चा नारा, हिंदू स्त्रिया म्हणाल्या, 'अल्ला हो अकबर'
ठाणे: देशातील काही राज्यांमध्ये प्रकरणावरून वाद निर्माण झालेला असताना ठाण्यातील मुंब्रा येथे हिंदू मुस्लीम एकतेचे चित्र पाहायला आहे. कर्नाटक येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आणि मुंब्रा येथील मुस्लीम महिलांनी संयुक्तपणे निषेध आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान मुस्लीम महिलांनी 'जय श्री राम', 'भारत माता कि जय'चे नारे दिले. तर हिंदू महिलांनी 'अल्ला हो अकबर' चे नारे दिले. या दरम्यान मुंब्रा येथील महिलांनी हिजाब हा मुस्लीम धर्मातील महिलांचा पेहराव आहे त्याच्या बद्दल कुणाला काही त्रास होण्याचे कारण नसून आपली ती संस्कृती नसल्याचे महिलांनी सांगितले. हिंदू धर्म असे सांगत नाही की एखादी मुलगी चालली आहे आणि अर्वाच्यपणे धार्मिक घोषणा द्या, शाळा किंवा महाविद्यालयीन विभाग हा धर्मविरहित असतो हे फक्त शिक्षण घेण्यासाठी असते, धर्माचा डंका वाजवण्यासाठी नाही. त्यामुळे धर्माचे राजकारण कुणीही शाळा किंवा शिक्षण संस्थांमध्ये करू नका, असे मत यावेळी मुंब्रा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (hijab issue women from support students from karnataka) हिजाबवर बंदी घातली जाईल या कर्नाटकातील एका मंत्र्याच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद कर्नाटकमध्ये उमटलेले पाहायला मिळाले. कर्नाटक येथील एका कॉलेजमध्ये श्रीराम सेनेकडून मुस्लीम तरुणीला हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास रोखले. त्यानंतर तिला गेटबाहेर बसवून ठेवण्यात आले. त्या घटनेनंतर आज ठाण्यातील मुंब्रा परिसरातून राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला संघटनेच्या वतीने त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या आधी देखील श्रीराम सेनेकडून ‘पब’मधून बाहेर आलेल्या तरुणींना त्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्कर्ट घातल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली होती. क्लिक करा आणि वाचा- उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारचे धार्मिक बाबींवर राजकारण केले जात असल्याचा आरोप मुंब्रा येथील महिलांनी केला आहे. या निषेधआंदोलना दरम्यान कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत ‘राम के नाम पर मत बाट इन्सान को’, 'भारत माता की जय, 'अल्ला हो अकबर' अशा जोरदार घोषणा दिल्या. या घोषणाबाजी दरम्यान हिंदू महिलांनी ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा दिल्या तर मुस्लीम महिलांनी 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. क्लिक करा आणि वाचा- यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऋता आव्हाड यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत हिजाब हा इस्लाम धर्मातील महिलांचा पेहाराव असल्याचे सांगण्यात आले. या श्री राम सेनेच फक्त हिजाब बद्दल विरोध नसून बंगलोर मध्ये देखील जीन्स स्कर्ट घातलेल्या तरुणींना देखील विरोध केला होता. जर संविधान मला माझ्या धर्माप्रमाणे किंवा मनाप्रमाणे कपडे घालून वावरायची अनुमती देत असेल तर या धर्माच्या ठेकेदारांना त्यांना अचानक याचा त्रास होण्याची गरज नाही. उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यात ज्या निवडणुका होत आहेत, त्या ठिकाणी श्रीराम सेनेचा पाठीराखा असलेल्या पक्षाचे काही योगदान नाही, काम नाही, त्यामुळे त्यांना निराशा आली आहे. त्यामुळे काहीतरी करून अशा प्रकारे खेळ खेळायचे, असा आरोप यावेळी मुंब्रा येथील महिलांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंब्रा भागात वर्षानुवर्षे हिंदू, मुस्लीम, बोरी, शीख, ख्रिश्चन असे सर्व धर्मीय लोक राहतात. परंतु इथे कधीही धर्माने विभागलेले नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून राजकारण हे फक्त धार्मिक धृवीकरणावर केले जात आहे आणि ते चुकीच असल्याचे महिलांनी सांगितले. धर्म कोणाला वाटत नाही, जर देव बोलतो सगळी माझी लेकर आहेत, जर अल्ला म्हणतो कि सारे मेरे बंदे है, तर मग ही श्री राम सेना कोण? असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wZzclQ2
Post a Comment