Header Ads

ad

'सभागृहात काही सदस्य टाइमपास करत जनतेचे लाखो रुपये वाया घालवतात'; झिरवळ यांची खंत

डोंबिवली: विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना असंसदीय भाषेचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असून याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी खंत व्यक्त केली आहे. झिरवळ यांनी हा मुद्दा ऐरणीवर घेत सभागृहात योग्य भाषेचा वापर केला जावा, तसेच मुद्द्यावर बोलून सभागृहाचा मौल्यवान वेळ घेत जनतेचे लाखो रुपये वाया जावू नयेत यासाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.आजच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप करत असताना भाषेचा स्तर खाली जात आहे, सध्या जे काही चालले आहे ते चुकीचे आहे आणि ते असेच सुरू राहिले तर सभागृहाचे सर्व अधिकार संपुष्टात येतील, अशी भिती झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. ( narhari jirwal has said that millions of rupees are being wasted by the members due to time passing in the legislative assembly) या मुद्द्यावर बोलत असताना या बाबत मी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक लवकरच बोलावणार असल्याचे ते म्हणाले. सार्वभौम असलेल्या सभागृहात चुकीचे वर्तन करणे बरोबर नाही असे अनेक ज्येष्ठांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. मागील निलंबनाच्या विषयात सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला. सुप्रीम कोर्टाचा अवमान होता कामा नये. मात्र जर असेच होत राहिले तर एक दिवस सार्वभौम सभागृहाचे अधिकारच संपुष्टात येतील. म्हणून यासाठी सर्व पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे झिरवळ यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- आज सत्ता कोणाची आहे, हे महत्वाचे नाही. मात्र बाहेर सर्वसामान्य माणासाचे काही अपेक्षा असतात. मात्र आपण सभागृहात आर्वाच्च भाषेत बोलले जाते, असंसदीय भाषेत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्ये केली जातात याची खंत लोकांना आहे. लोक ती व्यक्त करतात. ही खंत माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणूनच मी सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावून आवश्यक त्या सूचना देणार आहे, असे झिरवळ यांनी सांगितले. या सूचना सर्व राजकीय पक्षांनी पाळाव्यात आणि पक्षप्रमुखांनी आपल्या आमदारांना त्या सूचना द्याव्यात अशी अपेक्षा झिरवळ यांनी व्यक्त केली आहे. क्लिक करा आणि वाचा- अधिवेशनात यंदा फक्त ६ दिवस चालले. मात्र, असे असतानाही सभागृहाचे सदस्य सभागृहात एखादा मुद्दा मांडताना कोणतातरी जुना विषय काढत टाइमपास करत बसतात आणि लाखमोलाची वेळ वाया घालवतात. त्यातील एक एक मिनिटाचा लाखो रुपयांचा खर्च सर्वसामान्यांचा होत आहे. त्याचा विचार सर्व पक्षप्रमुखांनी करावा अशी माझी विनंती आहे, असेही झिरवळ यांनी पुढे सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hf1FpvX

No comments