sameer wankhede: समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांकडून आठ तास चौकशी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे प्रतिज्ञापत्रावरील खोट्या माहितीच्या आधारे तसेच वयाबाबतच्या अटींचे उल्लंघन करुन प्राप्त केल्याच्या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबईचे माजी विभागीय संचालक यांची बुधवारी कोपरी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला असून विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मुद्देसूद उत्तरे दिल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. आवश्यकता वाटल्यास चौकशीसाठी वानखेडे यांना पुन्हा बोलवले जाईल असेही अधिकाऱ्याने सांगितले. (Kopari police interrogated for eight hours) उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर वानखेडे यांच्याविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना हंगामी संरक्षण देत २८ फेब्रुवारीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याविषयी न्यायालयाने निर्देश दिल्याने वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. परंतु, या गुन्ह्याप्रकरणी कोपरी पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याविषयी वानखेडे यांना नोटीस पाठवली होती. तसेच त्यांना गुन्ह्याच्या तपासामध्ये अडथळा येईल असे कृत्य करू नये, गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा त्यांना प्रलोभन देऊ नये, पुरावा नष्ट करू नये, जेव्हा चौकशीसाठी बोलवले जाईल तेव्हा उपस्थित राहण्याच्या सूचनाही पोलिसांनी या नोटीसद्वारे दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सकाळी ११.३० वाजता वानखेडे चौकशीसाठी कोपरी पोलिस ठाण्यात हजर झाले. क्लिक करा आणि वाचा- वानखेडे यांच्या सोबत त्यांचे वकील देखील पोलिस ठाण्यात आले होते. परंतु, वकिल पोलिस ठाण्याच्या बाहेरच थांबले होते. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ७.३० वाजता वानखेडे पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. वानखेडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून हा जबाब पाच ते सहा पानांचा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. वानखेडे यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मुद्देसूद उत्तर दिली असून ते तपासाला सहकार्य करीत असल्याचे या पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आवश्यक वाटल्यास वानखेडे यांना परत पोलिसांकडून बोलवण्यात येणार आहे. परंतु, चौकशीमध्ये नेमके त्यांनी पोलिसांना काय सांगितले याविषयी समजू शकले नाही. क्लिक करा आणि वाचा- पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी समीर वानखेडे यांना या प्रकरणाविषयी विचारले असता, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत काही सांगता येणार नाही. मी तपासामध्ये सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले. तर, ईडीने अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याच्या प्रकरणात वानखेडे यांनी बोलण्यास नकार दिला. क्लिक करा आणि वाचा-
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ox5ri2Y
Post a Comment