Header Ads

ad

suspension of 12 mlas revoked: मोठी बातमी; राष्ट्रपतींच्या भेटीनंतर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन अखेर मागे

मुंबई: विधानसभेतील भाजपच्या १२ घेण्याचे मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर विधान परिषदेचे सभापती यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांना दिलासा मिळाला आहे. (legislative council chairman has announced to withdraw the ) भाजपच्या विधानसभेतील १२ आमदारांचे निलंबन झाल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निकाल देत ही निलंबनाची कारवाई रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल २८ जानेवारीला दिली होता. आमदारांचे निलंबन ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस करण्याचा अधिकार विधानसभेला नाही. असे असतानाही भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन वर्षभरासाठी रम्यात आले. ही शिक्षा लोकप्रतिनिधींच्या हकालपट्टीपेक्षाही गंभीर म्हणावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द करताना म्हटले होते. क्लिक करा आणि वाचा- सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयासंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मुंबईत आलेल्या राष्ट्रपतींची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करणारा आहे अशा शब्दात राष्ट्रपतींकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रपती कोविंद यांनी हा निर्णय तपासून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही राष्ट्रपतींना केली असल्याचे निंबाळकर म्हणाले. त्याचवेळी आम्ही १२ आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याचे निंबाळकर यांनी जाहीर केले. क्लिक करा आणि वाचा- न्यायालयाने विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करणे योग्य आहे का, अशी वितचारणआ आपण राष्ट्रपतींकडे केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाबाबत निर्णय दिला, त्या अर्थी आमचे अधिकार कमी झाले आहेत का? हे घटनात्मक खंडपीठाने स्पष्ट करावे असे पत्र आम्ही दिले आहे. १२ आमदारांचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित नसून तो देशव्यापी आहे, असेही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- ज्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे त्या भाजपच्या १२ आमदारांमध्ये आशीष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, संजय कुटे, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते , पराह अळवणी, नारायण कुचे, कीर्तीकुमार बागडिया आणि योगेश सागर यांचा समावेश आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cVqJmFv

No comments