करोना चाचण्यांबाबत 'या' जिल्ह्यात प्रशासनाने घेतला महत्वपूर्ण निर्णय!
: जिल्ह्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असून दैनंदिन रुग्ण संख्या आता ५० ते ७० च्या दरम्यान आली आहे. तसंच उपचाराधीन रुग्णांची संख्याही ७०० च्या आत आली आहे. त्यामुळे आता चाचण्यांचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. () पालकमंत्री मुश्रीफ यांनी मंगळवारी नगरमध्ये करोनासंबंधी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, जिल्ह्यात सध्या दररोज ६ हजार चाचण्या केल्या जात आहे. मात्र, आता त्या हळूहळू कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात औषध साठा, ऑक्सिजनची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये सध्या करोनाचा एकही रुग्ण नाही. गेल्या आठवड्यातील बाधितांचे प्रमाण १.५३ टक्के आहे. जिल्ह्यात सध्या ६२६ सक्रिय रुग्ण आहेत. लसीकरणाचे प्रमाणही वाढत आहे. १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण ८४ टक्के आहे, तर मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण ७२ टक्के आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सरकारतर्फे मदत देण्यात येत आहे. त्यासाठी १५ हजार ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यातील १० हजार ४०१ अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांच्यासाठी ४५ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित उपस्थित होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mQKiaqW
Post a Comment