Header Ads

ad

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या मुळावरच घाव घातला, एका ट्विटमधून सगळंच बोलल्या!

बीड : 'कर्ते नाकर्तेपणाची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या', असं आव्हान दिलेल्या मंत्री यांना भाजप नेत्या यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलंय. तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या मुळावरच घाव घातला आहे. बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. तसंच यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना पंकजांनी टार्गेट केलं होतं. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना, 'माझ्यावर टीका करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका. कोण काय करतंय याची चर्चा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या', असं धनंजय मुंडे म्हणाले होते. धनंजय मुंडे यांच्या याच आव्हानाला पंकजा यांनी बोचणारं प्रत्युत्तर दिलंय. पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय? भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या कार्यालयाने ट्विट करत म्हटलंय, "तुमच्या कर्तेपणाचे किस्से तुमच्या फेसबुक वॉलपासून सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्ट ते ईडीपर्यंत जगजाहीर आहेत. बाकी स्वपक्षातील बीड जिल्ह्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या लक्षवेधी सुचनांवर आधी जाहीर चर्चा घडवून आणा, नंतर आमचा नाद करा" पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांच्या मुळावरच घाव घातलाय. पंकजा मुंडेंनी एकाच ट्विटमधून धनंजय मुंडे यांच्या संबंधित ४ प्रकरणांवर भाष्य करत त्यांना क्लिन बोल्ड केलंय. फेसबुक वॉलवर आपल्या संबंधांची कबुली, सेशन कोर्टाचा सुतगिरणी प्रकरणी आदेश, सुप्रीम कोर्टातलं जगमित्र जमिन लूट प्रकरण आणि किरीट सोमय्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे धनंजय मुंडेंमागे लागलेला ईडीचा फेरा, अशा विषयांवरुन धनंजय मुंडे पुरते घेरलेले आहेत. हाच धागा पकडत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर प्रहार केलाय. प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल पंकजा मुंडेंआधी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर प्रहार केला. जगमित्र कारखान्याच्या नावाखाली एक पत्र्याची पाटी लावून शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारे, जगमित्र सुतगिरणीवर कर्ज करुन स्वतः जप्तीत गेलेले, परळीत नको ते ऊद्योग करुन व्यापारी बांधवांना दहशतग्रस्त करणारे आज सकाळी जिल्ह्यातील उद्योगांच्या बतावण्या करत आहेत, घोर कलयुग, अशी बोचरी टीका प्रीतम मुंडे कार्यालयाने ट्विट करुन केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LXWgEAc

No comments