Header Ads

ad

राज्यपाल सावित्रीबाईंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का? : नाना पटोले

परभणी : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची थट्टा करत असतील तर आमचं रक्त थंड झालंय का? आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागणार आहे. राज्यपाल फार मोठं बोलून गेले. आता जागे होण्याची गरज आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. ते परभणी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सावित्रीबाई फुलेंनी या देशातील महिलांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्याबद्दल जर राज्यपाल अपशब्द वापरत असतील तर ती तुमच्या आमच्यासाठी गंभीर आहे. म्हणून आता जागे व्हायला पाहिजे, असं नाना पटोले म्हणाले देवेंद्र फडवणीस, रामदास आठवले यांच्यावर टीका 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, पुन्हा एकदा गांधी परिवाराच्या नेतृत्वात, देशामध्ये सत्ता बदल घडणार आहे. त्यामुळे आम्हाला कोणी सल्ला देण्याची गरज नाही. ज्या काँग्रेसच्या भरोशावर अनेक वर्ष राजकारण केलं, त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. सरकार ५ वर्षे टिकणार पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यामध्ये सत्ताबदल होणार अश्या चर्चा असल्याच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित काम करत असून, सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असं म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/adMBytU

No comments