Header Ads

ad

मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असंच राजकारण सध्या सुरु, आंबेडकरांची जळजळीत टीका

औरंगाबाद: सध्याचे राजकीय वातावरण म्हणजे मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असंच सुरु आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख यांनी केली आहे. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असे राजकारण चालले आहे का? तू माझी दाढी पकड आणि मी तुझी शेंडी असंच सुरु असल्याचं सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे जनतेला सुद्धा असंच राजकारण पाहिजे आहे. त्यामुळे दोष कुणाला देणार, निवडून आलेल्यांना की निवडून देणाऱ्याला? असेही प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारले. "माझं देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आहे की, नुरा कुस्तीतील पैलवान होण्यापेक्षा त्यांनी मैदानातील पैलवान व्हायला पाहिजे. फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांना पेनड्राईव्ह दिला आहे. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे त्यांनी तो पेनड्राइव्ह जनतेला द्यावा, त्यानंतर त्यांना लोकं आखाड्यातील पैलवान मानतील. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना ठरवायचं आहे की, ते नुरा कुस्तीतील पहिलवान आहे की आखाड्यातील पैलवान?", अशी फटकेबाजीही आंबेडकरांनी केली. औरंगाबादेतील सभा पुढे ढकलली औरंगाबाद येथे आज वंचित बहुजन आघाडी आणि मुस्लिम इत्तेहाद फ्रंट यांची शहरातील अमखास मैदानावर जाहीर सभा होणार होती. या कार्यक्रमाला कर्नाटक येथील मुस्कान खान सुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र काल रात्री पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली असून, २२ मार्चला यावर सुनावणी होईल, असेही आंबेडकर सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/z20mwsD

No comments