राज ठाकरेंना धमकीचं पत्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये चर्चा
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत नांदगावकर आणि गृहमंत्री वळसे पाटलांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर आज वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित विषयावर सखोल चर्चा केल्याची माहिती आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7ZeDmz8
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7ZeDmz8
Post a Comment