Header Ads

ad

हेरवाडनंतर आता 'माणगाव' ग्रामपंचायतीचे मोठे पाऊल; विधवा प्रथेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत माणगाव ग्रामपंचायतीने आपल्या गावातही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. तसेच गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला गावाकडून माहेरची साडी म्हणून पैठणी भेट देण्याची एक चांगली प्रथा सुरु केली. खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरातून पुन्हा एका परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. प्रथम कोल्हापूरमधील हेरवाड गावाने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त हा ऐतिहासिक निर्णय घेतला.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/o9D42AU

No comments