आता शरद पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांवर झालेला अन्याय दूर करावा, ब्राह्मण महासंघ आक्रमक
शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मण संघटनांना भेटायला बोलावलं होतं. आम्ही त्यांची ती भेट नाकारली होती. शरद पवार यांना ब्राह्मण द्वेषाचेच राजकारण करायचंय आणि त्यांच्या विचारात काही फरक पडणार नाही हे कारण सांगून आम्ही ती भेट नाकारली होती आणि दुर्दैवाने आमची ती भीती खरी ठरली. आज शरद पवार यांनी बोलताना बाबासाहेब पुरंदरेनी छत्रपतींवर अन्याय केलं, असं वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत, असं ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/avEm6r7
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/avEm6r7
Post a Comment