चिंताजनक! वाघाच्या हल्लात तीन दिवसात चार जणांनी गमावले जीव, चंद्रपुरात पसरली दहशत
Tiger attack in Chandrapur : जनावरांसाठी गवत कापण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घडली. रूपा रामचंद्र म्हस्के (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने तीन दिवसात चार जणांचे बळी घेतले. तर एक शेतकरी गंभीर जखमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1qJShvc
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1qJShvc
Post a Comment