भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि अनिता बिर्जे यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल, मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप
रविवार 9 ऑक्टोंबर रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रा जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी बंडखोर सेना नेत्यांवर तुफान हल्लाबोल केला. भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान हल्लाबोल केला. यावेळी भास्कर जाधवांनी शिंदेंची नक्कल केली, राऊतांनी राणेंची नक्लल केली, तर अंधारेंनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली. या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर बाळा गवस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/e81gAuo
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/e81gAuo
Post a Comment