Header Ads

ad

चंद्रकांतदादा खुळ्यासारखे बडबडताहेत!; पवारांवरील टीकेने 'हा' मंत्री भडकला

कोल्हापूर: 'महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे मानसिक संतुलन ढासळल्यासारखी वागत आहेत. डोक्यावर परिणाम झाल्यागत, खुळ्यासारखे ते बडबडत आहेत', अशी टीका ग्रामविकास मंत्री यांनी केली असून या टीकेनंतर चंद्रकांतदादा व मुश्रीफ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( Minister Targets state president ) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यावर टीका केली आहे. या टीकेचा हसन मुश्रीफ यांनी आजरा येथे झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रचार मेळाव्यात खरपूस समाचार घेतला. 'बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. लोकसभेच्या दहा ते बारा व विधानसभेच्याही दहा ते बारा निवडणुका ते जिंकले. देशाचे कृषी मंत्री, संरक्षण मंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते एकदाही पराभूत झालेले नाहीत', अशा शब्दांत पवारांच्या नेतृत्वाचं मोठेपण सांगताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले. 'चंद्रकांत पाटील यांनी काहीही न करता एकदा नव्हे दोनदा मोठी संधी मिळाली. किती भाग्यवान आहेत ते? परंतु, या सगळ्याचा राज्याला तर सोडाच कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा काहीही उपयोग झालेला नाही', अशी तोफच मुश्रीफ यांनी पाटलांवर डागली. 'ते' आमचे उमेदवार नव्हेत मेळाव्याआधी मंत्री मुश्रीफ यांच्यासह प्रमुख मान्यवर जनता बँकेच्या सभागृहात चहा घेत बसले होते. त्यावेळी हातात पावती घेऊन एक शेतकरी तिथे आला आणि मुश्रीफ यांना विचारले, 'हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले ते तुमचे उमेदवार आलेत काय? त्यावेळी मुश्रीफ यांनाही क्षणभर काहीच समजेनासे झाले. नंतर विषय लक्षात येताच, आमचे उमेदवार व जयंत आसगावकर आहेत. ते पैसे घेऊन गेलेले आमचे उमेदवार नव्हेत, असे मुश्रीफ यांनी शेतकऱ्याला सांगितले. दरम्यान, पैसे घेऊन जाणारा तो उमेदवार कोण, यावरून नंतर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा जोरदार फड रंगला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kY6H2V

No comments