नव्या करोनावर लस किती उपयुक्त ? राजेश टोपे म्हणाले...
मुंबई : करोना प्रतिबंधासाठी मान्यता मिळालेल्या दोन लशींच्या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये सुस्पष्टता नसताना करोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूवर या लसी उपयुक्त ठरतील का, असाही प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. केंद्र सरकारने मात्र यासंदर्भात राज्य सरकारला कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत, असे राज्याचे यांनी सांगितले. वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये करोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूवर लसींच्या होणाऱ्या परिणामांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वैद्यकीय मांडणी केली जात आहे. केईएम रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता व संचालक तसेच आयसीएमआर सदस्य डॉ. नीलिमा क्षीरसागर यांनी, जगभरामध्ये या विषाणूचा संसर्ग झालेला आहे. प्रत्येक देशामध्ये संसर्गाचे व आजाराच्या तीव्रतेचे प्रमाण वेगवेगळे आहे, त्यामुळे या विषाणूचे वर्तन बदललेल्या स्वरूपामध्ये किती काळ असेच राहते यावरही अनेक बाबी निर्धारित आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कोणत्याही संसर्गाजन्य आजारामद्ये विषाणूचे वर्तन काही ठराविका कालावधीनंतर बदलते, तसेच ते या विषाणूच्या संदर्भातही झाले आहे. नव्या प्रकारच्या विषाणूवर लसीचा उपयोग होईल असा आशावाद डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केला. सार्वजनिक रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अभ्यासकांनी या टप्प्यावर लसीची परिणामकारकता किती असेल हे निश्चितपणे सांगता येणार नाही, त्यासाठी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू व्हावी लागेल याकडे लक्ष वेधले. संसर्गाची लक्षणे न दिसताही अनेक व्यक्तीमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत,प्रत्येक व्यक्तीमध्ये हे प्रमाण वेगवेगळे आहे, त्यामुळे अण्टीबॉडीजची त्यांची गुणवत्ता महत्त्वाची मानायची की प्रमाण यावरही वैद्यकीय विश्लेषण सुरू आहे. संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूच्या वर्तनामध्ये सातत्याने होणारे बदल हे लसीकरणातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे औषधशास्त्राचे अभ्यासक डॉ. ए.ए. पंडित यांनी सांगितले विलगीकरण किती दिवसांचे? नव्या करोनाचा राज्यातील ७५ व्यक्तींना संसर्ग झाला आहे. या व्यक्तींसह त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा विलगीकरणाचा कालावाधी किती दिवसांचा असावा यासंदर्भात चर्चा सुरु आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांनी विषाणूच्या संसर्गाचा फैलाव करण्याची शक्यता लक्षात घेता हा कालावधी १४ नाही तर २१ दिवसांचा असावा असे सूचित केले आहे. पालिकेचे अतिरिक्त यांनी केंद्र सरकारने हा कालावधी १४ दिवसांचा नियमावलीमध्ये स्पष्ट केला आहे, मात्र तो २१ दिवस ठेवावा का, यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3njSxuk
Post a Comment