मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची कार्यालयात आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, मुंबई विद्याविहार रेल्वे स्थानकातील पश्चिमेकडील आपल्या कार्यालयातच रेल्वे अधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. कैलास कदम असे त्यांचे नाव असून म्हणून ते कार्यरत होते. कल्याण येथील घरातून नेहमीप्रमाणे कदम कामावर हजर झाले. कार्यालयात पोहचल्यावर त्यांनी चहा घेतला. त्यानंतर त्यांनी कार्यालयाचा दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ झाल्यावरही दरवाजा उघडत नसल्याने उपस्थित रेल्वे कर्मचारी व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. यावेळी कदम यांनी वायरच्या मदतीने गळफास घेतल्याचे दिसून आले, असे रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत माहिती देताच पोलिसांसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदम यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. कर्जामुळे उचलले पाऊल? कदम यांनी नुकतेच मोठ्या रकमेचे कर्ज काढले होते. या कर्जाच्या हफ्त्याच्या तणावामुळे कदम यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेचा अधिक तपास घाटकोपर पोलिस करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XoGocQ
Post a Comment