Header Ads

ad

राजकीय पर्यटन करण्याचा कुणी प्रयत्न केला तर...!; अजितदादांचा थेट इशारा

मुंबई: सर्वांगीण विकासासाठी पर्यटन ही संकल्पना घेऊन राज्याच्या पर्यटन विभागाने आजचा साजरा केला. त्यावरच बोट ठेवत उपमुख्यमंत्री यांनी जोरदार फटकेबाजी केली. अजित पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या दलबदलूंचा यावेळी चांगलाच समाचार घेतला. ( ) वाचा: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात यावरच बोट ठेवत अजित पवार यांनी पक्षांतर करणाऱ्यांना फटकारले. 'जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने मांडण्यात आलेली 'सर्वांगीण विकासासाठी पर्यटन' ही संकल्पना कुठल्याही पक्षाच्या नेत्यांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी नाही', असे नमूद करत अजित पवार यांनी टोलेबाजी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याआधी एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत करण्याचा जे प्रयत्न करतील त्यांचा कुठल्याही पद्धतीने सर्वांगीण विकास होणार नाही, याची काळजी मुख्यमंत्री, मी आणि बाळासाहेब घेणार आहोत. त्याबद्दल तीळमात्रही शंका मनाममध्ये बाळगू नका, असे मुख्यमंत्री आणि यांच्याकडे पाहत अजित पवार म्हणाले. वाचा: 'राजकीय पर्यटन वगळून सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. यात मीडियानेही मनापासून साथ द्यावी. तुम्ही अधून मधून ब्रेकिंग न्यूज सोडून एखाद्या प्रेक्षणीय ठिकाणाची माहिती देणार असाल तर आम्ही पर्यटन विभागाकडूनही त्यासाठी तुम्हाला क्लिप देऊ... ह्या असल्या चांगल्या क्लिप देऊ, नको त्या देणार नाही. नाहीतर हा काय बोलला, तिकडनं महिला काय बोलली... हा आमदार काय बोलत होता. मग ते बोलताना दाखवायचं पण नाही... टिंब टिंब टिंब जोडायची. काय समजायचं माणसाने. या टिंब टिंबचा अर्थ काय होतो? जाऊ द्या त्यात आता जास्त खोलात मी जात नाही', असे म्हणत अजित पवार यांनी पर्यटनावर महत्त्वाचं भाष्य केलं. वाचा: अर्थमंत्री म्हणून पर्यटन विकासाला कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. देशात सर्वात जास्त गड-किल्ले आणि धरणं महाराष्ट्रात आहेत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खासकरून धरणांच्या जवळ जलसंपदा विभागाच्या मालकीच्या अनेक जमिनी आहेत. तिथे पर्यटनासाठी सुरक्षेचा विचार करून विकास केला पाहिजे, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करतच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. व्यवसाय व्यापार करताना काळजी घ्यावी लागणार आहे, असेही अजित पवार म्हणाले. जग फिरण्याआधी आपला महाराष्ट्र फिरा आणि बाहेर फिरण्यासाठी जात असाल तर तेथील पर्यटकांना महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहित करा, असे आवाहन राज्यातील पर्यटनप्रेमींना अजित पवार यांनी केले. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ALu7S9

No comments