Header Ads

ad

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला MIM चा विरोध, शिवसेना म्हणतीये, 'कितीही शक्ती लावा, पुतळा होणारच'!

औरंगाबाद : अमरावती जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकीय वादाची घटना ताजी असतानाच, आता औरंगाबादमध्ये सुद्धा पुतळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. महाराणा प्रताप यांचा एक कोटी रुपयांचा निधी खर्च करून पुतळा उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक, युवतींसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. तर यावरून आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत कुणी कितीही शक्ती लावली तरीही महाराणा प्रताप यांचा पुतळा होणारच असा इशारा दिला आहे. अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, औरंगाबाद शहरात होऊ घातलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला खासदार जलील यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच पुतळ्याऐवजी एखादी शाळा बनवावी असं जलील यांनी म्हटलं आहे. राज्यासाठी भावाला मारणारे, बापाला जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांचा इतिहास असलेल्या मंडळींना कुठून प्रेरणा मिळेल? त्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा इशारा दानवे यांनी यावेळी दिला. गेल्या महिन्यात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सिडको कॅनॉट परिसरात उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी आमदार अतुल सावे आणि अंबादास दानवे यांनी केली होती. मात्र महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यापेक्षा याच निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरु करून त्याला महाराणा प्रताप यांचे नाव देण्याची मागणी करणारे पत्र जलील यांनी सादर केले होते.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/358ihX7

No comments