Header Ads

ad

'लतादीदीचे स्मारक आम्हाला शिवाजी पार्कात नको'; कृपया यावरून राजकारण थांबवावे'; पंडित हृदयनाथ मंगेशकरांची विनंती

मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी () यांच्या चर्चित शिवाजी पार्कमधील स्मारकाच्या मुद्द्यावर राजकीय वाद सुरू झाला आहे. काही नेत्यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी मागणी केली आहे, तर काही नेत्यांनी या स्मारकाला विरोध दर्शवला आहे. यावर लतादीदींचे बंधू आणि सुप्रसिद्ध संगीतकार (pandit hridaynath mangeshkar) यांनी प्रथमच आपले मत व्यक्त करत सर्व नेत्यांना स्मारकावरून होणारे राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक व्हावे अशी आमची ईच्छा नसल्याचे पंडित मंगेशकर यांनी म्हटले आहे. (we do not want in shivaji park please stop politics has requested) 'स्मारक शिवाजी पार्कात व्हावे अशी आमची ईच्छा नाही' आपले मनोगत व्यक्त करताना पंडित मंगेशकर म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर, म्हणजे आमची दीदी, आमचीच नाही तर साऱ्या जगाची दीदी. तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी आकाशएवढी नाही, तर ती अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळीत अनेक गंगानदी ओतल्या तरी ती पोकळी भरून निघणारी नाही. लता मंगेशकरांच्या स्मारकावरून वाद चालू आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीयांनी या वादात भाग घेण्याचे काही कारण नाही. कारण दीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे ही आमची ईच्छाच नाही. क्लिक करा आणि वाचा- 'दीदीबाबत राजकारण करणे थांबवावे' पंडित मंगेशकर पुढे म्हणाले की, शिवाजी पार्कात दीदीचे स्मारक होण्याऐवजी उलट आमचे असे म्हणणे आहे की, शिवाजी पार्कातील स्मारकावरून जो राजकीय लोकांचा वाद सुरू झाला आहे तो वाद त्यांनी बंद करावा आणि दीदींच्याबाबत कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्र सरकारने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. ती विनंती स्वत: लतादीदींनीच केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ती मागणी अतिशय आनंदाने मान्य केलेली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. आता दीदीचे एक संगीत स्मारक होत आहे. त्यापेक्षा कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही. क्लिक करा आणि वाचा- 'दीदी गेल्याने युगान्त झाला आहे' श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने, दीदी गेल्याने एक संगीत पर्व संपले आहे. नव्हे युगान्त झाला आहे, अशा शब्दात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SFnt7u2

No comments