Header Ads

ad

रशिया- युक्रेन युद्धामुळं मुंबईत घरांच्या किंमती वाढल्या; पुढील तीन महिन्यांत बसणार फटका

बांधकामासाठी आवश्यक कच्च्या मालांच्या किमती वाढल्याचा भार ग्राहकांवर पुढील तीन महिन्यांत बसणार फटका किमतीत १० ते १२ टक्के वाढणार मुंबई : जगाच्या अर्थव्यवस्थेवर रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जाणवू लागला आहे. कच्चा तेलाच्या दरातील वाढीपाठोपाठ गृहनिर्माण क्षेत्रातील कच्चा मालाच्या किमतीही वाढत चालल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील घरांच्या किमतीवरही त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घर बांधणीसाठी आवश्यक असलेल्या लोखंड, सीमेंट, तांबे, अल्युमिनियम या घटकांच्या किमती वाढल्याने त्याचा भार ग्राहकांवर येऊन पुढील तीन महिन्यात घरांच्या किमतीत १० ते १२ टक्के वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर सर्वच उद्योगक्षेत्रास पूर्ववत गती येत असतानाच अचानक रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाने व्यवसायांवर दुष्परिणाम उदभवू लागला आहे. इंधन दर वाढल्याने महागाई वाढत चालल्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी, देशांतर्गत स्तरावर इंधन दर वाढण्याचे संकेत दिले जात असल्याने वाहतुकीसह अन्य सर्व घटकासह गृहनिर्माण क्षेत्रासही महागाईचा भार सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जाते. त्याचवेळी, सध्याच्या स्थितीत घरांच्या किमती वाढण्यास आणखी काही कालावधी लागेल, असा अंदाज 'लायसेस फोरस' या गृहनिर्माण क्षेत्रातील संशोधन कंपनीच्या पंकज कपूर यांनी व्यक्त केला आहे. केंद्राबरोबर चर्चा सुरू रशिया-युक्रेन युद्धाने निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांत गृहनिर्माण क्षेत्रातील कच्चा मालाच्या किमतीत वाढ होत आहेत. जागतिक परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ होत आहेत. त्या किमती कमी न झाल्यास घरांच्या किमती वाढू शकतात. त्यासाठी किमतींविषयी संघटनेतर्फे केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. -संदीप रुणवाल, अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र-व्यवस्थापकीय संचालक, रुणवाल ग्रुप वाढत्या किमतीचा भार गृहनिर्माण क्षेत्रात पोलाद, सीमेंट, कोळसा, इंधन दर, मालवाहतूक खर्चातील वाढीचा सातत्याने परिणाम जाणवत आहे. कच्चा मालाच्या किमतीतील वाढीने प्रकल्पांच्या खर्चात वाढ होत जाते. त्यातून ग्राहकांवर भर येत असतो. -बोमन इराणी, क्रेडाई एमसीएचआय किमती हा चिंतेचा विषय करोना संसर्गाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर उद्योगविश्व सावरत असतानाच कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत आहे. सर्वसामान्यांच्या घरखरेदीवर परिणाम होऊ नये यासाठी क्रेडाई- एमसीएचआयमार्फत कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ होऊन नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. -प्रीतम चिवुकुला, सह-संस्थापक आणि संचालक, त्रिधातु रियल्टी व खजिनदार, क्रेडाई एमसीएचआय ग्राहकाभिमुख धोरण हवे सध्या बांधकाम खर्चात वाढ झाली आहे. इंधन दरासह अन्य कच्चा मालाच्या दरात वाढ होत आहे. त्या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती वाढण्याची टांगती तलवार आहे. या परिस्थितीत ग्राहकांवर ताण पडू नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. -रोहित पोद्दार, व्यवस्थापकीय संचालक, पोद्दार हाउसिंग अँड डेव्हलपमेंट लि.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yaYKBZ8

No comments