आजच्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्याच्या पदरात पडल्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी
अमरावती : महाविकास आघाडी शासनाचा अर्थसंकल्प सामाजिक न्याय, समानता, शिक्षण, आरोग्य, महिला-बालकांना योग्य प्रतिनिधित्व देणारा अर्थसंकल्प आहे. उद्योग - व्यवसायासाठी पोषक वातावरण देणारा तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. महिला बाल विकास विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे वर्ष महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबविण्यात येत आहे. आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, महिला व बालविकास, तसेच सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद, कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग या पंचसूत्रीवर आधारलेला असून सर्व क्षेत्रांना न्याय मिळवून देणारा अर्थसंकल्प धरला असून अमरावती जिल्ह्याच्या पदरी हा विकास आला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी आवश्यक सुविधा, आदिवासी आश्रमशाळा, विमानतळ, आरोग्य सेवा यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे, तसेच विविध विभागांकडे पाठपुरावा केला. त्यानुसार 282 कोटी रूपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. - पोहरा येथे शेळी समूह योजना, अमरावती विमानतळ विकासाची तरतूद - अमरावतीत होणार अत्याधुनिक दर्जाचे ट्रामा केअर सेंटर - आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठा निधी - अमरावती जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळांसाठी मोठया निधीची तरतूद करण्यात आली आहे. - मोझरीत शैक्षणिक सुविधांसाठी निधीची तरतूद - महिला व बालकांच्या विकासासाठी मोठा निधी - पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना - नागरी बालविकास केंद्र उभारणार
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1UbSetB
Post a Comment