सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा; द्राक्ष बागांचे मोठे नुकसान
सांगली जिल्ह्याच्या अनेक भागातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषता पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे. वादळी वाऱ्यासह तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तर नागठाणे संतगाव, अंकलखोप परिसरात प्रचंड गारपीट झाली आहे. गारांचा मारा झाल्यामुळे द्राक्ष शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FOiUWIB
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FOiUWIB
Post a Comment