hivre bazar: आदर्श गाव हिवरे बाजारमध्येही तंटामुक्तीत अडथळे, आता घेतला 'हा' निर्णय
गेल्या ३० वर्षांपासून आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये शेती आणि शिवारासंबंधीचे वाद आणि त्यावरून निर्माण होणारे तंटे गावातच मिटविण्यात येत होते. मात्र, यावेळी ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्याने अन्य गावांप्रमाणेच तेथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे यापुढे कोणतेही तंटे तंटामुक्ती समितीसमोर थेट न आणता आधी पोलिस ठाण्यात नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुमारे तीस वर्षांनंतर गावकऱ्यांना अशा तंट्यांसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JArNfly
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JArNfly
Post a Comment