Header Ads

ad

ठाणे, पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; 'हे' आहे कारण

म. टा. वृत्तसेवा, ठाणे/पालघरः लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे लसीकरण त्या तुलनेत प्रचंड कमी होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात लसीकरणाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिला आहे. ९० टक्के लसीकरण पूर्ण न झाल्याने ठाणे आणि पालघर जिल्हा निर्बंधमुक्तीपासून दूर राहिला आहे. १ फेब्रुवारीपासून करोनासंसर्ग रोखण्यासंदर्भात राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुधारित आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार, ९० टक्के लाभार्थ्यांनी करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा आणि ७० टक्के लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतलेली असेल तर त्या जिल्ह्यात जवळपास सर्व निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील ७८ टक्के लोकांनी पहिली मात्रा, तर ६४ टक्के लोकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाकडे ठाणेकरांनी पाठ फिरविल्यामुळे तसेच अनेक ठाणेकरांनी कामाच्या ठिकाणी मुंबईमध्ये लस घेतल्याने ठाणे जिल्हा लसीकरणामध्ये पिछाडीवर राहिल्याचे दिसून येते. वाचाः पालघर जिल्ह्यातील ८२ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा, तर ६८ टक्के नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. पालघर हा आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, वाडा, पालघर येथील अनेक नागरिकांचे पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर होत आहे. त्यातच करोना निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड तणावाखाली जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात निर्बंधमुक्तीसाठी आवश्यक अटींमध्ये बदल करावा किंवा त्या कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील अनेक नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, नवी मुंबई आदी ठिकाणी तसेच जव्हार-मोखाडा येथील नागरिक नाशिक जिल्ह्यात, तर तलासरी आणि जव्हार येथील नागरिक सिल्वासा, दमण व गुजरातमधील काही भागात ये-जा करीत असतात. या लोकांनी त्या-त्या भागात लसीकरण करून घेतले असल्याने जिल्ह्यात लसीकरणाची नोंद कमी दिसत आहे. वाचाः जिल्ह्याबाहेर लसीकरण केल्याचा परिणाम ठाणे आणि पालघर जिल्ह्यात लसीकरण अधिक झाले असले तरी अनेकांनी जिल्ह्याबाहेर लसीकरण केल्यामुळे ही टक्केवारी कमी दिसून येत आहे. त्यामुळे लग्न, यात्रा, आठवडे बाजार, जिम, पर्यटनस्थळे, मॉल, खासगी-सार्वजनिक वाहतूक, दुकाने, थिएटर आदी पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kHWdV2B

No comments