येत्या काही तासांत राज्यातील 'या' भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
राज्यातील मुंबई, ठाणे, जळगाव, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर पडत असताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे. या दरम्यान ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lL9KZUR
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lL9KZUR
Post a Comment